Navjot Singh Sidhu : 'जर देवाने मला वरदान दिले, तर मी कोहलीला...'; नवज्योत सिंह सिद्धू यांच्या पोस्टची क्रिकेट वर्तुळाच चर्चा, काय म्हणाले..

Navjot Singh Sidhu on Virat Kohli : भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली नेहमी चर्चेत असतो. VHT मध्ये आपल्या खेळीने सर्वांना प्रभावित केले होते. अशातच कोहलीबाबत सिद्धू यांनी मोठे विधान केले आहे.

Navjot Singh Sidhu : 'जर देवाने मला वरदान दिले, तर मी कोहलीला...'; नवज्योत सिंह सिद्धू यांच्या पोस्टची क्रिकेट वर्तुळाच चर्चा, काय म्हणाले..
Youtube
Navjot Singh Sidhu : 'जर देवाने मला वरदान दिले, तर मी कोहलीला...'; नवज्योत सिंह सिद्धू यांच्या पोस्टची क्रिकेट वर्तुळाच चर्चा, काय म्हणाले..

मुंबई : टीम इंडियाचे स्टार खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी विजय हजारे ट्रॉफी गाजवली. दोघांनीही शतके करत ते इतके मोठे खेळाडू का आहेत हे आपल्या प्रदर्शनामधून दाखवून दिलं. आपल्या फिटनेसवर काम रोहितने आपण वर्ल्ड कपसाठी तयार असल्याचं दाखवून दिलं आहे. तर दुसरीकडे विराट पहिल्यापासून टीममध्ये फिटनेसच्या बाबतीत आघाडीवर राहिला आहे. दोघेही आता फक्त वनडे फॉरमॅट खेळत आहेत. विराटमध्ये आताही कसोटी क्रिकेट खेळण्याची क्षमता आहे. याच पार्श्वभूमीवर माजी क्रिकेटपटून आणि समालोचक नवज्योत सिंह सिद्धूने विराटबाबत केलेले विधान चर्चेत आले आहे.

जर देवाने मला एक वरदान दिले असते, तर मी म्हटले असते की कोहलीला वृत्तीतून परत आणून कसोटी क्रिकेट खेळवावे. या देशासाठी यापेक्षा जास्त आनंदाची आणि उत्साहाची गोष्ट काय असू शकते. त्याचा फिटनेस २० वर्षांच्या मुलासारखा आहे, तो एक २४ कॅरेट सोन्यासारखा असल्याचं नवज्योत सिद्धू याने म्हटलं आहे.

विराट कोहली याने १२ मे २०२५ रोजी कसोटी क्रिकेटमधून अधिकृतपणे निवृत्ती जाहीर केली. या अनपेक्षित निर्णयामुळे चाहते आणि क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली होती. विराटमध्ये अजूनही देशाला देण्यासाठी कसोटी क्रिकेट शिल्लक होते. मात्र टीम मॅनेजमेंटचा दबाव असल्याची दबक्या आवाजात चर्चा होती. विराट कसोटी टीममध्ये असल्यावर मैदानावरील विरोधी संघावर त्याची दहशत दिसायची. कॅप्टन असताना विराटने परदेशात जात यजमानांना अनेकदा दबावात ठेवले होते. कसोटी क्रिकेटमधील त्याचा जो काही दबदबा होता त्या प्रत्येकाने पाहिला आहे. मात्र आता नवख्या टीममध्ये तो जोर काही दिसत नाही.

आता झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत कोहलीने एकूण ३०२ धावा केल्या, ज्यात दोन शतके आणि एक अर्धशतकी खेळी समाविष्ट होती. या कामगिरीसाठी त्यांना प्लेयर ऑफ द सिरीज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५३ आणि एकूण ८४ शतके (एक टी२० आंतरराष्ट्रीय शतक धरून) केली आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कोणत्याही एका फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतके करण्याच्या बाबतीत त्यांनी सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. सचिनच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४९ शतके आहेत, तर कोहलीच्या नावावर ५३ शतके आहेत.